HomeBIG BREKINGभाटुंबा ग्रामपंचायतीवर प्रश्नचिन्ह :

भाटुंबा ग्रामपंचायतीवर प्रश्नचिन्ह :

हनुमान मंदिरात मनोज जरांगे यांचा फोटो

बीड : जिल्ह्यातील भाटुंबा येथील ऐतिहासिक व श्रद्धेचे केंद्र असलेल्या हनुमान मंदिरात अलीकडे समाज आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांचा फोटो लावण्यात आला. या कृतीमुळे गावात व परिसरात मोठा वाद निर्माण झाला असून इतर समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याचे स्पष्ट होत आहे.धार्मिक स्थळ म्हणजे आस्था, श्रद्धा आणि एकतेचे प्रतीक मानले जाते. अशा पवित्र ठिकाणी कोणत्याही व्यक्तीचा, आंदोलन नेत्याचा किंवा राजकीय नेत्याचा फोटो लावणे अनुचित असल्याचे नागरिकांचे ठाम मत आहे. देवस्थान हे सर्व समाजाचे असल्याने तेथे केवळ देव-देवतांचीच पूजा व्हावी, इतर कोणत्याही स्वरूपातील व्यक्तीपूजेला जागा नसावी, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.या प्रकरणी सर्वात मोठा प्रश्न ग्रामपंचायतीच्या भूमिकेवरच निर्माण झाला आहे. इतकी मोठी घटना गावात घडूनही ग्रामपंचायतीने यावर कोणताही प्रतिबंध घातला नाही. “ग्रामपंचायतीने वेळीच पावले उचलली असती, तर श्रद्धास्थानाच्या अपमानाचा प्रश्नच निर्माण झाला नसता,” असा रोष ग्रामस्थांमध्ये व्यक्त होत आहे.स्थानिक नागरिकांनी याबाबत नाराजी व्यक्त करत सांगितले की, “मंदिर हे व्यक्तींच्या प्रचाराचे ठिकाण नाही. इथे देवच हवेत, माणसांचे फोटो नव्हेत. अशा कृतींमुळे समाजात फूट पडते आणि श्रद्धेचा अपमान होतो.”सध्या या घटनेमुळे गावात चर्चेला उधाण आले असून, धार्मिक ठिकाणांचा वापर वैयक्तिक गौरवासाठी किंवा आंदोलनाच्या प्रचारासाठी करू नये, अशी सर्वसामान्यांची मागणी होत आहे.

BM Live News
BM Live News
बी एम न्यूज चॅनेलचे उद्देशपत्र “सत्य हाच आमचा धर्म, न्याय हाच आमचा ध्यास” बी एम न्यूज चॅनेल समाजाशी निगडित प्रत्येक प्रश्नाला योग्य न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहे. आमचे कार्यक्षेत्र केवळ बातम्या देण्यापुरते मर्यादित नसून, समाजातील उपेक्षित, गोरगरीब व वंचित घटकांचे प्रश्न सरकार व प्रशासनापर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे. आमचे प्रमुख उद्दिष्टे : 1. अन्यायाविरुद्ध लढा – समाजातील दुर्बल व वंचित घटकांवर होणारे अत्याचार, अन्याय व शोषण उघड करून त्यांना न्याय मिळवून देणे. 2. सरकारी धोरणांवर लक्ष – शासनाच्या विविध योजना व धोरणांचा खराखुरा लाभ जनतेपर्यंत पोहोचतो का, यावर प्रकाशझोत टाकणे. 3. प्रशासकीय जबाबदारी – सरकार व पोलीस प्रशासनाकडून होणारे गैरप्रकार, बेफिकिरी व चुकीचे निर्णय लोकांसमोर आणणे. 4. सामान्यांचा आवाज – शेतकरी, मजूर, बेरोजगार, महिला व तरुण यांच्या समस्या योग्य व्यासपीठावर मांडून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणे. 5. सत्यनिष्ठ पत्रकारिता – राजकीय दबाव वा आर्थिक स्वार्थ यापेक्षा समाजहिताला प्राधान्य देत निष्पक्ष आणि प्रामाणिक पत्रकारिता करणे. आमची वचनबद्धता : बी एम न्यूज चॅनेल सदैव समाजाच्या न्यायासाठी, सत्यासाठी आणि लोकशाहीच्या बळकटीसाठी काम करत राहील. गोरगरीबांचा आवाज बुलंद करण्याचे, अन्याय उघड करण्याचे आणि जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्याचे व्यासपीठ म्हणजे बी एम न्यूज.
RELATED ARTICLES
Jharkhand
clear sky
40 ° C
40 °
40 °
9 %
4.4kmh
5 %
Wed
41 °
Thu
42 °
Fri
42 °
Sat
44 °
Sun
44 °

Most Popular