Homeटेक्नोलॉजीमहिलांच्या सबलीकरणासाठी सुपे (बारामती) येथे ‘श्री स्वामी समर्थ कौशल्य प्रशिक्षण केंद्र’ सुरू

महिलांच्या सबलीकरणासाठी सुपे (बारामती) येथे ‘श्री स्वामी समर्थ कौशल्य प्रशिक्षण केंद्र’ सुरू

महिलांना आत्मनिर्भरतेकडे नेणारे पाऊल

BM NEWS

: BM NEWS

सुपे (बारामती)


युवा कौशल्य कृषी विकास बहुउद्देशीय संस्था, अहिल्यानगर यांच्या वतीने ‘श्री स्वामी समर्थ ट्रेनिंग सेंटर’ सुपे (ता. बारामती) येथे सुरू करण्यात आले. या केंद्राच्या उद्घाटन सोहळ्यास संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष माननीय ईश्वर निमसे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

निमसे यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांबाबत माहिती देत महिलांना आवाहन केले की, “महिलांनी संस्थेमार्फत कौशल्य प्रशिक्षण घेऊन स्वतःचा व्यवसाय उभारावा, संसाराला आर्थिक हातभार लावावा आणि उद्योजकतेचे स्वप्न साकार करावे. संस्था महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी कटिबद्ध आहे.”

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेच्या बारामती तालुका बिझनेस मॅनेजर अश्विनी अमोल बर्गे यांनी केले. त्यांनीच हे प्रशिक्षण केंद्र सुरू केले असून, परिसरातील महिलांना आपल्या आवडीनुसार विविध कौशल्य प्रशिक्षण घेऊन प्रत्यक्ष जीवनात त्याचा लाभ मिळावा, हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या उद्घाटन प्रसंगी संस्थेचे खजिनदार निलेश आखाडे, अवधूत घोरपडे, अमोल बर्गे, अजय सूर्यवंशी, गौरव जवळकर, गावातील मान्यवर व महिला उपस्थित होत्या.

BM Live News
BM Live News
बी एम न्यूज चॅनेलचे उद्देशपत्र “सत्य हाच आमचा धर्म, न्याय हाच आमचा ध्यास” बी एम न्यूज चॅनेल समाजाशी निगडित प्रत्येक प्रश्नाला योग्य न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहे. आमचे कार्यक्षेत्र केवळ बातम्या देण्यापुरते मर्यादित नसून, समाजातील उपेक्षित, गोरगरीब व वंचित घटकांचे प्रश्न सरकार व प्रशासनापर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे. आमचे प्रमुख उद्दिष्टे : 1. अन्यायाविरुद्ध लढा – समाजातील दुर्बल व वंचित घटकांवर होणारे अत्याचार, अन्याय व शोषण उघड करून त्यांना न्याय मिळवून देणे. 2. सरकारी धोरणांवर लक्ष – शासनाच्या विविध योजना व धोरणांचा खराखुरा लाभ जनतेपर्यंत पोहोचतो का, यावर प्रकाशझोत टाकणे. 3. प्रशासकीय जबाबदारी – सरकार व पोलीस प्रशासनाकडून होणारे गैरप्रकार, बेफिकिरी व चुकीचे निर्णय लोकांसमोर आणणे. 4. सामान्यांचा आवाज – शेतकरी, मजूर, बेरोजगार, महिला व तरुण यांच्या समस्या योग्य व्यासपीठावर मांडून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणे. 5. सत्यनिष्ठ पत्रकारिता – राजकीय दबाव वा आर्थिक स्वार्थ यापेक्षा समाजहिताला प्राधान्य देत निष्पक्ष आणि प्रामाणिक पत्रकारिता करणे. आमची वचनबद्धता : बी एम न्यूज चॅनेल सदैव समाजाच्या न्यायासाठी, सत्यासाठी आणि लोकशाहीच्या बळकटीसाठी काम करत राहील. गोरगरीबांचा आवाज बुलंद करण्याचे, अन्याय उघड करण्याचे आणि जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्याचे व्यासपीठ म्हणजे बी एम न्यूज.
RELATED ARTICLES
Jharkhand
scattered clouds
31.1 ° C
31.1 °
31.1 °
48 %
2.3kmh
50 %
Fri
30 °
Sat
40 °
Sun
42 °
Mon
41 °
Tue
43 °

Most Popular